नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता ‘बोर्ड परीक्षा ‘ फक्त बारावीलाच असणार! संपूर्ण माहिती जाणून घ्या.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता 'बोर्ड परीक्षा ' फक्त बारावीलाच असणार! संपूर्ण माहिती जाणून घ्या.

नवीन शैक्षणिक धोरण येत्या शैक्षणिक वर्षांपासून राबवण्यात येणार असून, सदर नवीन शैक्षणिक धोरणानुसार, पदवी चार वर्षांची करण्यात आली आहे. त्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग अकरावी ठरेल, तर दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करुन फक्त बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे. तर उच्च माध्यमिक शैक्षणिक वर्षाचा भाग नसणार आहे. ते कायमचे बंद होणार आहे.

सध्याचे शैक्षणिक धोरण 1986 पासून राबवण्यात येत होते. आता त्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून (2022-23) बदल होणार आहेत. नव्या धोरणानुसार, आता 5+3+3+4 असे शैक्षणिक टप्पे असणार आहेत.

माध्यमिकचा टप्पा नववी ते अकरावी
नव्या धोरणानुसार लागू झाल्या नंतर , पूर्व प्राथमिकचा पहिला टप्पा पहिली ते पाचवी, प्राथमिकचा दुसरा टप्पा सहावी ते आठवी, त्यानंतर माध्यमिकचा नववी ते अकरावी, असे टप्पे असतील. तर बारावी आता पदवीला जोडली असून, त्यामुळे आता उच्च माध्यमिकचा टप्पा नसेल.

शेवटच्या वर्षी अकरावी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य होते. मात्र, बारावीला बोर्डाची परीक्षा जाहीर केल्याने प्राथमिक व माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होतील. या निर्णयाचा फटका माध्यमिक शाळांना बसण्याची शक्यता आहे.

Spread the love

Leave a Comment