राज्यातील अंगणवाड्यांमध्ये 15 हजार रिक्त पदांची भरती जाहीर, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा.

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये 15 हजार रिक्त पदांची भरती जाहीर, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा.महिला व बालविकास विभाग अंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांमधील १५ हजार मदतनिसांची पदे भरली जाणार आहेत. सदर पद भरती जिल्हा निह्याय होणार असून, पात्र व इच्छुक उमेदवार महिलांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात एक लाखांवर अंगणवाड्या सुरू आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता मिनी अंगणवाड्या मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी मदतनीस व सेविकांची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांमध्ये नव्याने पदभरती होणार आहे.

दरम्यान २ फेब्रुवारी २०२३च्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मदतनीस व सेविकांच्या पदभरतीत ७५ गुण शैक्षणिक पात्रतेवर तर २५ गुण जातीनिहाय आरक्षणावरून दिले जातात. मात्र, मराठा आरक्षणानंतरही त्या शासन निर्णयात बदल न झाल्याने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीत पाच गुण मिळत नसल्याचे समोर आले आहे.

अंगणवाड्यांमधील भरतीची स्थिती

मिनी’च्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्या १३,०११
मदतनीस पदभरती १५,०००
सेविकांची रिक्त पदे ६,०००
भरतीचे एकूण गुण १००

मदतनीस महिला कर्मचाऱ्यास मोठ्या झालेल्या अंगणवाड्यांवर सेविका म्हणून प्राधान्याने नेमणूक मिळणार.

तत्पूर्वी, भरतीसाठी बारावी उत्तीर्णची अट घातल्याच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने सेविकांची भरती तुर्तास स्थगित आहे. त्यामुळे पूर्वीच्या ज्या मदतनीस महिला कर्मचारी बारावी उत्तीर्ण आहेत, त्यांना ‘मिनी’च्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्यांवर सेविका म्हणून प्राधान्याने नेमणूक दिली जात आहे. तर त्या अंगणवाड्यांमध्ये मदतनीस पदे नव्याने भरली जात आहेत. त्यात शैक्षणिक पात्रतेवर ७५ गुण असून उर्वरित २५ गुण विधवा, अनाथ, एससी- एसटी, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, दोन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव या बाबींवर आहेत. यामध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्ग नसल्याने मराठा आरक्षणानंतरही त्या उमेदवारांना भरतीत त्याचा लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

अंगणवाड्यांमधील पदभरती प्रक्रिया –

  • अर्जदारांमधून सेविका किंवा मदतनीस म्हणून उमेदवारांची भरती तथा निवड करताना १०० गुणांचा निकष लावण्यात आला आहे.
  • इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवारास गुणांच्या टक्केवारीनुसार ४५ ते ६० गुण दिले जातात. याशिवाय पदवीधर असल्यास एक ते पाच गुण (टक्केवारीनुसार), पदव्युत्तरसाठी चार गुण, डीएडसाठी दोन, बीएडसाठी दोन व ‘एमएस-सीआयटी’साठी दोन गुण अतिरिक्त दिले जातात.
  • याशिवाय विधवा, अनाथ उमेदवारासाठी १० गुण, एससी-एसटी प्रवर्गासाठी दहा गुण, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व विशेष मागास प्रवर्गासाठी पाच गुण आणि दोन वर्षांचा अनुभव असलेल्यांना पाच गुण, अशी गुणदानाची पद्धत आहे. या ‘एसईबीसी’ प्रवर्ग अजून समाविष्ट झालेला नाही.

अंगणवाडी मध्ये 14 हजार पदांची मेगाभरती , अर्ज करण्याची शेवट तारीख 31 ऑगस्ट!

अंगणवाडी मध्ये 14 हजार पदांची मेगाभरती , अर्ज करण्याची शेवट तारीख 31 ऑगस्ट!

राज्यातील अंगणवाडी मध्ये लवकरच १४ हजार ६९० रिक्त पदासाठी भरती होणार आहे. या अंतर्गत मदतनीसची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यावेळी अधिक माहिती देतांना मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. याबाबत अधिकृत याबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवट तारीख 31 ऑगस्ट!

शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत, त्या नुसार अंमलबजावणी करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून इच्छुक महिलांना आपले अर्ज मदणीस पदासाठी सादर करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.